इंग्रज गेले ,
आजादी मिळाली,
पण आपल्याच सरकारकडून,
सामान्य माणसाचे रक्तशोषण चालूच आहे !
कशासाठी ही आजादी ?
कुठे आहे ते स्वातंत्र्य ?
कोण आहे आज स्वतंत्र ?
कुणाला आहे देशासाठी अभिमान ?
सगळेच लाचार, लाळघोटे, स्वाभिमानशून्य, कणाहीन, स्वार्थी !
सत्तेसाठी - पदासाठी - खुर्चीसाठी हपापलेले !
कुणाला आहे का खरीच काळजी -
सामान्य जनतेची, कामगाराची, कष्टक-याची,बळीराजाची ?
खायला पुरेसे अन्न नाही, प्यायला पायपीट केल्याशिवाय पाणी नाही,
अंगावर ल्यायला धडूते नाही ?
काय उपयोग झाला -
आम्ही दिलेल्या रक्ताचा आणि तुम्ही आम्हाला मिळवून दिलेल्या
स्वातंत्र्याचा ...................? ,
" तुम मुझे खून दो , मैं तुम्हे आजादी दूंगा .." असे म्हणून,
" - नेताजी सुभाषचंद्र बोस - ",
तुम्ही म्हणून आमच्यातून निघून जाउनच, खरे स्वतंत्र झालात !
आज तुमची आठवण होत आहे ....
आपणास विनम्र वंदन ! ! !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा