तुम मुझे खून दो .....


इंग्रज गेले ,
आजादी मिळाली,
पण आपल्याच सरकारकडून,
सामान्य माणसाचे रक्तशोषण चालूच आहे !

कशासाठी ही आजादी ?
कुठे आहे ते स्वातंत्र्य ?
कोण आहे आज स्वतंत्र ?
कुणाला आहे देशासाठी अभिमान ?

सगळेच लाचार, लाळघोटे, स्वाभिमानशून्य, कणाहीन, स्वार्थी  !
सत्तेसाठी - पदासाठी - खुर्चीसाठी हपापलेले  !

कुणाला आहे का खरीच काळजी  -
सामान्य जनतेची, कामगाराची, कष्टक-याची,बळीराजाची  ?
खायला पुरेसे अन्न नाही, प्यायला पायपीट केल्याशिवाय पाणी नाही, 


अंगावर ल्यायला धडूते नाही  ?

काय उपयोग झाला -
आम्ही दिलेल्या रक्ताचा आणि तुम्ही आम्हाला मिळवून दिलेल्या 

स्वातंत्र्याचा ...................? ,

" तुम मुझे खून दो , मैं तुम्हे आजादी दूंगा .." असे म्हणून,


" - नेताजी सुभाषचंद्र बोस - ",

तुम्ही म्हणून आमच्यातून निघून जाउनच, खरे स्वतंत्र झालात !

आज तुमची आठवण होत आहे ....

आपणास विनम्र वंदन ! ! !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा