आली लहर


ती बिचारी सारखी ह्या कुशीवरून त्या कुशीवर पडून झोपण्याचा प्रयत्न करत होती.


पण छे !
निद्रादेवी प्रसन्न होण्याचे काही नावच घेत नव्हती .

अंथरुणावर पडल्या पडल्याच तिने आवाज दिला -
"अहो, तुमची ती कवितांची वही देता का मला जरा इकडे.
मला मेलीला झोपच येईना किती वेळ झालं ! "

तो खूष झाला आणि स्वत:शीच पुटपुटला -
"
नशीब उजाडलेलं दिसतय आपल्या वहीच रात्रीच्या भलत्याचवेळी ! चला, आपली कवितेची वही सत्कारणी लागणार तर आता एकदाची !"

त्याने आपले लेखन मधेच थांबवून,
कवितेची वही तिच्या हातात दिली.

त्याने हळुवारपणे विचारले-
"एकदम कशी काय लहर आली ग अशी रात्रीच,
माझ्या कविता वाचनाची ? "

ती उत्तरली-
"कविता वाचता वाचता तरी,
 मेली झोप येतेय का नाही, बघतेचना आता-
शेवटचा उपाय म्हणून ! "
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा