कानठळ्या


काय करावे तेच समजत नाही !
रात्रभर गणपतीचे देखावे पहातो .
साहजिकच सकाळी उशीरा जागा होतो.
 

कुठे काही वाजतंय का ..
काहीच उमजत नाही .
कानाचं अस्तित्वच जाणवत नाही .
कान बधीर झाल्याचे जाणवतात .
चुकून कानात बोळे घातलेत की काय असाही भास होतो.

दुपारी डुलकी घेता घेता, 

श्री गणेश पुन्हा कानाशी पुटपुटून गेल्याचा भास झालाच..

" त्या समोरच्या समईतल्या कापसाच्या वातीचे, 

जरा मोठ्ठेसे दोन बोळे करून-
 माझ्या दोन कानात घालतोस का ? 
डोळे बंद करून घेऊ शकतो,
 ...कानाला माझे हात लावू शकत नाही ना....
 ह्या मोदक आणि फुलांमुळे ! 
चतुर्थीपासून आता माझ्या विसर्जनापर्यंत... 
नाही रे हे सगळ सहन होणार ! "
 

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा