नशीब


सकाळी सकाळी चहा पीत असतांना,
बायकोशी वादविवाद - भांडण - धुसफुस - कुरकूर याचं पर्यावसान,
शेवटी कप विधुर होण्यात-

 किंवा 
बशी विधवा होण्यात नक्कीच होत असते !

एखादं कारण अगदी क्षुल्लक असतं -
'आज स्वैपाक कुणी करायचा ?'
किंवा -
' आज भांडी कुणी घासायची ? '

संसारातील यश/अपयश यांचा मागोवा घेत गेलो की,
एकदम डोक्यात प्रकाश पडतो -
अरेच्चा ! हे त्यावेळी कसं ध्यानात नाही आलं ?

लग्नाच्या वेळी भटजीबुवा मंगलाष्टकानंतर,
हिच्याकडे बघून म्हणाले होते-
"शुभ मंगल .."

पण माझ्याकडे बघून म्हणाले होते --
" सा व धा न ! "

त्यावेळी भटजीबुवाचं नीट ऐकले असते तर.....
आता माझी वेळ निघून गेली आहे .

उपवर/उपवधू मित्र - मैत्रिणीनो ,
समझदारको इषारा काफी है ना ?

माझ्या अनुभवावरून धडा घेतला तर ठीक...
नाही तर ,
तुम्ही आणि तुमचं नशीब !

. . .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा