अक्का, ताई, बाई, माई, बुवा, महाराज, बाबा, मांत्रिक, तांत्रिक आणि तत्सम अवतारी महोदय -


सर्व अक्का, ताई, बाई, माई, बुवा, महाराज, बाबा, मांत्रिक, तांत्रिक -
 आणि तत्सम अवतारी महोदय -

ह्यांना नम्र विनंती ....

काही तरी खराखुरा चमत्कार घडवा हो आतातरी -
आणि दुष्काळी वातावरणात पाण्याची सोय करा !

तुमच्या चमत्कारावाचून,
खेड्यातली नव्हे तर शहरातली जनतादेखील-

 सध्या केवळ डोळ्यातल्या पाण्यावरच तग धरून आहे .

फक्त भक्तमंडळीतच रमून जनतेचे दुर्दैव संपेल,
या भ्रमातून आता बाहेर पडा !

ह्यात काही कमीजास्त, काही उणेदुणे, काही चुकीचे चुकून लिहिले गेले असल्यास-

 उदार अंत:करणाने
क्षमस्व !

सर्व श्रद्धाळू, अंध श्रद्धाळू, आस्तिक ,नास्तिक जनतेने आपापल्या दैवताला
स्मरण करून "पाणी आहे तर जीवन आहे " असे म्हणून साकडे घालावे !

सर्व भक्तांनीच अपापल्या वर उल्लेखलेल्या महोदयांची "परीक्षा " घेण्याची,

 आता दुर्दैवाने वेळ आलेली आहे, हे ध्यानात ठेवावे !

|| शुभं भवतु || 

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा