पाणी म्हणजे जीवन


दार्जीलिँगहून कोलकत्याकडे जाण्यासाठी,

 आम्ही न्यू जलपैगुडी नावाच्या रेल्वेस्थानकाकडे कूच केली .
वाटेत नयनरम्य अशा सुंदर बर्फाळ 'कांचनजंगा'

 ह्या जगातल्या तिसऱ्‍या क्रमांकाच्या उंच पर्वतशिखराचे दर्शन झाल्याने ,
लग्नानंतर पुन्हा एकदा जीवनाचे सार्थक झाल्याची जाणिव झाली.
डोळ्याचे पारणे फिटेपर्यंत पाहून छायाचित्रात त्याला टिपले.

पण ...


त्या रेल्वेस्थानकावर मात्र एसीची सोय असून , 

एसी नेहमीप्रमाणे ऐन मोक्याच्या वेळीच बंद !
एसी हॉलमधल्या गैरसोयीने आणि गर्दीमुळे इतके हाल हाल झाले की, 

एकवेळ ते हालाहल नामक विष पिऊनही,
 जीवन आणखी एकदा सार्थकी लावले असते !

प्रचंड असह्य उकाड्याने अंगातून पाणी गळू लागले.
तहानेने जीव व्याकुळ-
तोँडाला पडली कोरड-
घशाची पाणी पाणी ओरड-

बाटली आणि नळाच्या साध्या पाण्यासाठी देखील
डोळ्यातून पाणी काढत ,
आम्हाला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागला की हो !


अंगात एवढे पाणी मुरलेले असून,

 त्यावरही पाणी पडले !

पाणी म्हणजे जीवन... 

असे म्हणणाऱ्‍याचे कौतुक करावे तितके थोडेच !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा