बालबुद्धी


लहानपणी गोष्टी वाचत असताना, 
कुठेतरी हमखास वाचण्यात यायचे ...

"' आणि मग आकाशातून,
 सर्व देवदेवतांनी उभे राहून,
 त्या मंगल प्रसंगी,
 आनंदाने पुष्पवृष्टी केली .'"

आणि मग माझ्या बालमनात
कुतूहलमिश्रीत  प्रश्न उभा राहायचा -

जर पावसाचा एक थेंब 
आकाशात एक सेकंद
 स्थिर राहू शकत नाही, 
तर हे एकाच वेळेस सर्व  देवदेवता
 आकाशात कसे काय स्थिर उभे राहू शकतात ,
एकामागे एक धपाधप
 पृथ्वीवर कसे काय आदळत  नाहीत बुवा ? 

विचारायला गेलो  की,
 आई आधी पाठीत धपाटा घालायची आणि,
 नेमके काहीतरी काम सांगून,
मला  घराबाहेर पिटाळायची !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा