सागरतीरी जोडा अपुला
हात घेउनी हाती बसला -
निरोप घेताक्षणी सखे
विचारलेस तू का ग मला -
"भेट ही शेवटची अपुली ,
वाईट वाटते काय तुला" -
बरे वाटले होते मजला
कारण सागर तो साक्षीला -
दु:ख जाहले किती मला
कसे ग सांगू सखे तुला -
जाणिव होताच सागराला
जवळ निरोपाचा क्षण आला -
अश्रूंच्या त्या लाटेमध्ये
माझे अश्रू मिसळुन आला . .
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा