आय क्यू वाढत आहे

नुकताच नवीन मोबाईल घेतला होता, तेव्हाची कथा .

बायको म्हाणाली होती -
"स्वैपाकाला आज थोडा उशीर होणार आहे.
जेवणाचे ताट मांडल्यावर बोलावते ."

मोबाईल हातात घेतला .
हेडफोन कानाला लावला .

दोन्ही कान बंद !
आळीपाळीने रफी, लता, मुकेश कानात जीव ओतून गाऊ लागले .....

अस्मादिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली !

बायको समोर येऊन काहीतरी बडबडू लागली असे मला वाटले .

मी विचारले-
"काय ग , वाढलं का ताट ?"

तशी बायको आपल्या स्वत:च्याच कानावर हात ठेवून उद्गारली-
"केवढ्याने ओरडताय हो ?
जेवायला चला, म्हणून तर मी सांगत होते ना मिनिटभर !"

आमच्या दोघांचे मोठे चढ्या सुरातले आवाज ऐकून नातू समोर आला .
माझ्या दोन्ही कानात मी कोंबलेले गट्टू त्याने पटकन काढले.

मला समजावत तो म्हणाला -
"अण्णा, आज्जीला वाटल तुम्हाला ऐकू येत नसाव, 

म्हणून ती मोठ्याने बोलली.
पण हे कानाला लावणाऱ्याला वाटते की, दुसऱ्याला ऐकूच येत नाही..
म्हणून तुम्ही गाण्याच्या आवाजापेक्षा मोठ्या आवाजात बोललात !

"अस होय .." पुटपुटत मी जेवायला निघालो .

हल्लीच्या नातवाला जेवढ मोबाईल/कंप्युटरमधल कळत,
तेवढ आजोबाला कळत नाही हो ! 

व्हेरी शार्प जनरेशन हं ...

तुम्हाला आला का असा कधी गमतीदार अनुभव ?
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा