लहरी

प्रेयसी
बरोबर असताना,
पाऊस
येतच नाही..


प्रेयसी
बरोबर नसताना,
हमखास
येऊन जातो -


वाण नाही
पण त्याला
गुण लागले
असावेत प्रेयसीचे.....


नको तेव्हा
तोंड दाखवायचे..
हवे तेव्हा नेमके
गुल व्हायचे .. !

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा