वजनदार उपास

येता जाता येरझाऱ्या घालत, 
बायको आरशापुढे उभी राहत होती .
स्वत:ला डोळे भरून न्याहळत होती .

न राहवून शेवटी मी विचारलेच -
" आज आरशाला कशी काय संधी ब्वा एवढाssssss वेळ ? "

ती पुन्हा आरशात पाहत उत्तरली- 
" काय करू समजत नाही . 
बघा ना, वजन कित्ती वाढतच चाललय ! "

मी म्हणालो-
" तू तर श्रावणात सोमवारी महादेव, मंगळवारी अंबाबाई, 
गुरुवारी दत्त, शुक्रवारी संतोषी माता देवीचा, 
शनिवारी शनीचा/मारुतीचा, रविवारी खंडोबाचा...
असे कितीतरी उपास करत असतेस ना .. 
शिवाय पंधरा दिवसाच्या, त्या दोन एकादशा आहेतच उपासाच्या !"

ती मला मधेच थांबवत म्हणाली-
" उपास करतेय ना ? मग वजन कमी नको का व्हायला ? "

मी म्हटले-
" हो ना ! वजन कमीच व्हायला पाहिजे ग !
पण तुझे हे सगळे उपवास.. म्हणजे खाण्याचे पदार्थ दुप्पट खास ! 
वजन कमी व्हायचे असेल तर, मुळात कमी खायला पाहिजे ना ?
तुझे उपासाचे ढीगभर पदार्थ आणत आणत ......
हे बघ माझेच वजन कमी होत चाललेय ! "
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा