माणूस


भारतीय...
 माणसाने म्हणे यंव केले ,
माणसाने म्हणे त्यंव केले ,
माणूस म्हणे दूरच्या ग्रहावर पोहोचला ,
माणूस म्हणे संगणक युगातले चमत्कार परदेशात जाऊन घडवू लागला ..

कोलकत्यातल्या "माणसा"ची परिस्थिती, 
याची देही याची डोळा पाहून झाली ..

डोळ्यात पाणी यायचेच राहिले !

म्हणे काळ बदलत आहे ..
पण आपल्या बिचा-या वीतभर पोटासाठी, 
तिथला "माणूस" आपल्याच तुटक्यामोडक्या सायकल रिक्षात,
 जास्तीतजास्त आरामात दुसऱ्या "माणसा"ला बसवून ..

अद्यापही, घाम गाळतच, 
आपल्या दोन्ही हातांनी रिक्षा ओढताना दिसत आहे ! 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा