तीन चारोळ्या..


धो धो धो धो पाऊस झाला 
पूर किती कवितेला आला -
बनल्या कवितांच्या होड्या 
पुरात आनंद वाहू लागला ..
.


का आभासी दुनियेमध्ये 
वाटे आपुलकीचे नाते-
अनुभव येता, धक्के खाता 
"परके अपुले" उमजत जाते..
.


दारी मरणाच्या कळले 
घरात जगणे होते सुंदर-
हातचे सोडून पळत्यापाठी धावणे
माझे होते वरवर..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा