पाच दोनोळ्या..

कुणी न बोलला जीवनी शब्द एक चांगला
झाला विस्मित अती मृतात्मा श्रद्धांजली ऐकुनी..

हसवत बसतो तो लोकांना आवडते म्हणुनी
फसवत असतो स्वतःस पण तो व्यथा दडवुनी..

कटीवर हात ठेवत तू निवांत उभा रहा विठ्ठला
दाखव दुष्काळात माझ्या गावी तू पाऊस पाडुनी..

फूल न साधे दिले कुणी जिवंतपणी ज्याला
निघाला पहा खांद्यावर तो हारांनी सजुनी..

समोर न भेटलीस मला तू नाही बिघडत काही
दिसते तुझीच प्रतिमा घेता डोळे बंद मी करुनी..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा