एक बाभळीच्या काट्यावर बसलेले,
दुसरे त्याच झाडाच्या डिंकावर चिटकलेले,
दोघांच्या गप्पा रंगात आलेल्या...
पहिल्याने दुसऱ्याला विचारले,
" ह्या जगात कसे काय आपण ? "
दुसरा उत्तरला -
" फाजील विश्वास !
चार चाकीतून चाललो होतो.
देवावर हवाला ठेवून झोपलो.
चालकाने गाडी ह्या झाडावर आदळली,
तो बाहेर पडून वाचला ! "
दुसऱ्याने पहिल्याला विचारले,
" आपण कसे काय ? "
पहिला उत्तरला -
" विश्वास !
दुचाकी चालवत होतो.
देवावर विश्वास ठेवून, राम राम म्हणत, निघालो .
गार झुळकीने मधेच डुलकी लागल्यावर,
ह्या झाडावर दुचाकी आदळली.
मित्र नास्तिक असल्याने वाचला ."
एकूण काय,
भुते देखील इतरावर जबाबदारी ढकलण्यात तरबेज असतात !
.
भुते शेवटी मानवी अस्तित्वाचा भूतकाळ असतात , तेव्हा गुण आणि वाण हा लागायचा.
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल आभारी आहे, निनाद .
हटवा