पळसाला पाने तीनच


काल मैत्रीदिन संपला.
आजपासून आणखी ३६४ दिवस-
ह्या "दीना"चे रोजचे रहाटगाडगे सुरू .......

"हे करा -" 
"ते करा -"
" हे का केले नाही -" 
"तेच कसे करायचे राहिले -"

ऑफिसातही तेच 
आणि -
घरीही तेच !

तिकडे "बॉसगिरी "
आणि -
इकडे "बायकोगिरी" !

एक ना दोन ....
काम करूनही वर दादागिरी त्यांचीच !

कंटाळा आला ह्या सहनशीलतेचा !

कधी कधी वाटत,
जीव द्यावा कुठेतरी जाऊन .

पण तेवढे धाडस कुठले ?

तिथेही येऊन पुन्हा वर दम भरायला तयार -
" जीव द्यायला हीच जागा आणि हीच वेळ बरी सापडली हो तुम्हाला ! "

काही झाले तरी शेवटी ...
एक "नवरा" ना !

भोगा आता नवरेपणाचे भोग ह्याजन्मीचे !

आपले दु:ख हलके करावे ह्या सद्हेतूने ,
मघाशी हळूच,
 एका विवाहित मित्राकडे हे सगळे माझे दु:ख सांगायला गेलो तर ...

तोच माझ्या गळ्यात पडून रडत म्हणाला -
" मी हेच सांगायला तुझ्याकडे येणार होतो रे आत्ता ! "

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा