तीन चारोळ्या ---

कधीच पडले धारातीर्थी
इमानी सच्चे वीर मावळे -
शिवरायाचे नांव गर्जुनी
जगती लुच्चे डोमकावळे !
.

कुठे भेटलो दोघे आपण
कशा स्मराव्या आज खुणा
पावलात मिसळली पावले
उरल्या कोठे पाऊलखुणा !
.

कुणी कुणाचे येथे नसते
जमती सगळे तिकिटापुरते -
मेनका सत्तेची नाचे जिकडे
विश्वामित्र पळतो तिकडे...
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा