अचानक


कधी नाही ते चारपाच मित्र त्याच्याकडे आले.

आले ते आले-
कसला निरोप न देता,
कुणाला न सांगतासवरता,
फोनबिन काही न करता,
अचानकच आले !


मोठमोठ्या आवाजात गप्पा टप्पा सुरू झाल्या .
हास्याचे फवारे उडवता उडवता,
" आज आम्ही निवांत आहोत !"
- त्या चारपाचजणांनी एकमुखाने सांगितले.

"अरे वा, खूपच छान ! हे एक बरे केले..
निवांत वेळ काढून आलात .
धम्माल करत बसू आपण आज सगळे मिळून !
आता हिला आधी पटकन,
 नाष्ट्यासाठी म्यागी करायला सांगतो ...."
- असे त्यांना तो म्हणाला.

आणि -
तो दिवाणखान्यातून,
स्वैपाकघरात बायकोला सांगून,
बाहेर येईपर्यंत ..............


दिवाणखाना रिकामा झालेला होता !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा