काल होतो आज नाही
भान ठेवा भूवरी
का फुकाची
अवगुणाची द्वेषनिंदा अंतरी
वर तराजू अंति एकच तोलणारा पाहिला
काल तो ऋणकोच होता जाहला धनको जरी
ये म्हणालो मी
सुखाला माझिया घरट्यात रे
दु:ख हटवा सुख
म्हणाले करुन त्रागा सत्वरी
बहर आला वेदनेला
आणि मी आनंदलो
पानगळ पण हो
सुखाची त्याक्षणी का बावरी
मार्गदर्शक काजवा
का वाटतो अंधारता
गर्व करुनी सूर्य
देतो जरि प्रकाशा इथवरी ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा