चार चारोळ्या

माणसे नकोत घरोघरी आता 
पाहिजे फेसबुक व्हाटसअप हाती 
कुठेही कसेही एकटेच बसायचे  
विसरून भान माणुसकी नाती ..
.

माझ्याजवळी तू बसता 
रुसतो का प्राजक्त इकडे 
हलवत आपल्या फांदीला 
घालतो सडा फुलांचा तिकडे..
.

मी शांतीचा आहे भोक्ता
तो होता सुटला सांगत
ना ठेवला विश्वास ज्याने 
का त्याच्याशी बसला भांडत ..
.

नकोस देवा रे सुख देऊ 
कधीच तू मला आयुष्यात 
घेऊ चव मी कधी सुखाची 
गुरफटलो इतका दु:खात..
.

[साहित्यमंथन /ई  दिवाळी अंक २०१८ / इंद्रधनू ]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा