मनाला वाटते तेव्हा ... (गझल)

मनाला वाटते तेव्हा किती कामात चरतो मी
खिशाची भूक मिटवाया विनातक्रार दमतो मी..

कशाला बाळगू भीती तसा निर्लज्ज मी झालो
कुणाच्याही घरी जेव्हा मनी येताच निघतो मी..

जरी मी ठेवतो नावे कुणाच्या कर्मकांडाला
मला जमतो मुकाट्याने नवससायास करतो मी.. 

कसे मोरास वाटावे दिसावे नाचताना मी
पडेना थेंब एखादा उगा का आस धरतो मी..

किती मी धावतो आहे जिवाची लावुनी बाजी
जरी ठाऊक मृगजळ ते तरी मोहात फसतो मी..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा