अनागोंदी

वाराणशी ते पुणे (मार्गे) ठाणे :

नेपाळचा प्रवास संपला.
कशीविश्वेश्वराचे दर्शन झाले. 
स्वगृही परतण्यास निघालो. 
निरनिराळ्या देव-देवतांना नवस बोलत, साकडे घालत, गाऱ्हाणे मांडत ...
आमची निमआराम यष्टी ठाण्याहून निघाली सव्वा दोनला बरोब्बर .

लोणावळ्याच्या अलीकडे गचके खायला सुरुवात केली.
चालकाने तत्परतेने थांबवली. 
काही कुरकुरणाऱ्या प्रवाशांना त्याने मागून येणाऱ्या दुसऱ्या यष्टीत बसवले.

त्याच्याकडूनच चौकशीअंती समजले, 
" ह्या यष्टीच इंजिन गरम झाले आणि 
रोजच साधारण एकदोन यष्ट्या अशाच कारणाने मधेमधे बंद पडतात ! 
आम्ही चालक तक्रार करतो, पण कुणी त्याची दखल घेत नाही. 
तर तुम्ही प्रवाशांनीच तक्रारी कराव्यात ! "

काही वेळाने तावातावात झालेल्या चर्चात्मक वादात,
एकदोन सहप्रवासी आणि तो चालक यांच्यात एकमत झाले की,
"सबंध देशात अशा अनागोंदी आणि नियमबाह्य
कारभाराने सुधारणा होणारच नाही !"

थोड्या वेळाने चालक, आम्ही प्रवासी आणि यष्टी -
सगळे मिळूनच गार झाल्यावर गाडी पुढे मार्गस्थ झाली.

लोणावळ्याला महामंडळाच्या कृपेने,
"स्वस्त जिन्नस महाग विकणाऱ्या" "अधिकृत"
हॉटेलसमोर आमची गाडी पाणी पिण्यासाठी थांबली. 
बिच्चारे पैसेवाले प्रवासी आणि फुकटे चालकवाहक... !
सगळीकडे ही बोंब माहित असूनही, 
सोयीस्कर दुर्लक्ष करूनच आपले महामंडळ झोपा काढत आहे. 

आमच्यासारख्या काही "गरजू अक्कलशून्य" प्रवाशांनी,
तिथे 'फ्रुटी'सारख्या पेयासाठी-
प्याकवर १४ रुपये एमआरपी लिहिलेले असूनही,
झकत २० रुपये खर्चले .

उशीरा का होईना ..
तहानभूक भागल्यावर, मी सुटकेचा निश्वास टाकला !
तीन चार ब्यागा आणि बायको..
एकाचवेळी सांभाळणे, म्हणजे काय चेष्टा आहे का राव ?
अक्षरश: तारेवरची कसरत !

एक प्रवासी केबिनमधे बसला
आणि (नियमानुसार ?) - पुन्हा चालकाशी 
चालत्या गाडीत सरकारी अमानुष धोरणाबाबत चर्चा करू लागला !
तो चालकही इकडे तिकडे समोर बघून यष्टी चालवत, 
त्या प्रवाशाशी (नियमानुसारच का ?) बोलत,
आपल्याही अडचणी सांगत होता. 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा