काळजी लाखमोलाच्या जिवाची

  परवाच्या भुतानच्या आमच्या दौऱ्यात, 
बहुतेक उद्धट/उर्मट/बेजबाबदार/निष्काळजी/बिडीफुंक्या असा कारचालक नव्हता, 
म्हणून खूप बरे वाटले.

     उलट तिथले चालक कार सुरू होण्याआधी, व्यवस्थित आपला सीटबेल्ट लावत असत,
आणि शेजारी बसणाऱ्यालाही आवर्जून लावायला सांगत !
एकाही कारचालकाने ओव्हरटेकिंगचा प्रयत्न केल्याचे आठवत नाही. 
मुळातच समंजस असणार ते कारचालक ! कौतुक करावे तेवढे थोडेच.

     "अति घाई संकटात नेई" अशी पाटी, "फक्त वाचण्यापुरती" आपल्याच भागात दिसते. 
त्यामुळे खूप समाधान वाटत असे.... पुणेरी वातावरणाच्या तुलनेत !
फुनशोलिंग ते न्यूजलपाईगुडी या प्रवासात मात्र, 
अपवादाने आमचा कारचालक दर पंधरावीस मिनिटानी, 
कार चालवतांना, कुणाला ना कुणाला तरी त्याच्या मोबाईलवर बोलतांना आढळला. 
... विशेष म्हणजे मोबाईलचे अधूनमधून चार्जिंग चालू असतानाही !
     
     तिसऱ्या वेळेला मात्र त्याची ती वागणूक असह्य होऊन,
मी त्याला कार बाजूला थांबवायला सांगितली..
आणि-
"चार्जिंगचा मोबाईल काढून, अर्धापाऊण तास निवांत मोबाईलवर
पाहिजे त्याच्याशी/ पाहिजे तेवढा वेळ बोलून घे-" असे बजावले.
आम्हाला रेल्वेस्थानकावर त्याने सोडल्यावर, 
त्याला शांतपणे मोबाईलवर बोलण्याचे फायदे/तोटे समजावले. 
त्यावर तोही मुंडी हलवत सहमत झाला !

तेवढेच एक "उपदेशात्मक सत्कृत्य" आपल्याकडून घडल्याचे.. 
मलाही समाधान वाटले !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा