"सतारवादक भारतरत्न" पं. रविशंकरजींचे दु:खद निधन झाले,
त्या दिवशी सकाळी बसथांब्यावर माझ्या बाजूला,
अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या दोन सुकन्या गप्पा मारत होत्या.
एक दुसरीला म्हणाली -
"सकाळपासून टीव्हीवर सारख्या त्याच त्या बातम्या दाखवत आहेत. कंटाळा आला यार ! "
दुसरी पहिलीला ठणकावून म्हणाली -
" अग, ते लांब केसवाले शंकर आहेत ना-
संतूर वाजवणारे, त्यांची बातमी दाखवत आहेत ! "
पहिली दुसरीला पुन्हा म्हणाली -
" ते संतूर त्रिकोणी समोर ठेवलेलं असत, ते नाही ग !
ते दुसर उभं वाद्य असत ना .. ते वाजवणारे गेले. त्यांची माहिती दाखवत आहेत ! "
मित्र/मैत्रिणीनो, ही सत्य घटना आहे !
तात्पर्य काय ते समजून घ्या ..
नाहीतर कपाळावर हात बडवत बसा !
. . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा