काय करावे तेच समजत नाही !
रात्रभर गणपतीचे देखावे पहातो .
साहजिकच सकाळी उशीरा जागा होतो.
कुठे काही वाजतंय का ..
काहीच उमजत नाही .
कानाचं अस्तित्वच जाणवत नाही .
कान बधीर झाल्याचे जाणवतात .
चुकून कानात बोळे घातलेत की काय असाही भास होतो.
दुपारी डुलकी घेता घेता,
श्री गणेश पुन्हा कानाशी पुटपुटून गेल्याचा भास झालाच..
" त्या समोरच्या समईतल्या कापसाच्या वातीचे,
जरा मोठ्ठेसे दोन बोळे करून-
माझ्या दोन कानात घालतोस का ?
डोळे बंद करून घेऊ शकतो,
...कानाला माझे हात लावू शकत नाही ना....
ह्या मोदक आणि फुलांमुळे !
चतुर्थीपासून आता माझ्या विसर्जनापर्यंत...
नाही रे हे सगळ सहन होणार ! "
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा