लाडू - एक शस्त्र !


कौरव-पांडवांचे युद्ध फार जोरात झाले होते,
असे म्हणतात.
दोन्ही पक्षांचे सैनिक वर्मी मार बसून मेले,
असे म्हणतात.
वर्मी म्हणजे अगदी मर्मावर अचूक ठिकाणी,
असे म्हणतात.
दिवाळी संपल्यावर काही आठवड्यानी ते युद्ध संपले,
असे म्हणतात !

असेही म्हणतात की,
वर्मी घाव घालून मारायला,
आणि ते योग्य रीतीने फेकून,
योग्य त्या मर्मावर बसायला..

आमच्या भटारखान्यातल्या
सध्याच्या आचाऱ्याच्या पूर्वजांनीच
ज्या शस्त्राचा वारेमाप वापर त्या युद्धाच्या वेळी केला होता..
त्याला म्हणतात..

" ला डू ".

........आजही ते शस्त्र
काही घराघरातून पहावयास मिळते,
असे म्हणतात !!!
.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा