लग्नानंतर हाल-अहवाल


.
नवराबायकोच्या गप्पात, 

बायकोने चहा पीतपीत ऐटीत मला विचारले,
" आपल्या लग्नानंतरची,

 एक तरी दु:खद घटना तुम्हाला आठवते का हो ? "
 

हताश सुरात मी उद्गारलो,

" अग, एकच का ? किती किती सांगू तुला -
 

तुझ्याबरोबर साडीखरेदीला जाणे;
... तुझी साडीखरेदी चालू असतांना, 

शेजारी चारपाच तास तरी माशा मारत बसणे;
साडीखरेदी संपली की, 

तुझा गजऱ्याचा हट्ट पुरवण्यासाठीही खिशात पैसे उरलेले नसणे;
आपण कधी नव्हे ते सहलीला निघालो की, 

नेमकी  तुझ्या माहेरची माणसे टपकणे;
तुझी सासू घरांत आली की, कामात आदळापट -

आणि माझी सासू आली की, सगळी कामं झटपट !
मी फक्त "तुला" म्हणून सांगितलेल गुपित,
तुझ्या आईकडून, दुसऱ्याच दिवशी, मला परत ऐकायला मिळणे-
.....ह्या सगळ्या तुला आनंदी घटना वाटतात की काय ? "

शेवटचे वाक्य पूर्ण ऐकायला.....
बायको समोर होतीच कुठे ?
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा