अति सर्वत्र वर्ज्ययेत !



त्या देवळातल्या देवाशपथ खरं सांगतो !
 

फक्त आणि फक्त,
 त्या देवळातल्या  देवाला मनापासून नमस्कार करण्यापुरता म्हणूनच,
 परवा एक देवळात गेलो होतो.
 

प्रवेशद्वारापासूनच,
निरनिराळ्या सूचनांच्या पाट्यांची सुरुवात झाली होती .

नमस्कार  " असा "  करावा .
प्रदक्षिणा  " अशी "  घालावी..
रांगोळी  " अशी "  घालावी...
नामस्मरण  " असे "  करावे ....
ध्यान  " असे "  करावे.....
जेवणात  " असे "  पदार्थ वाढावेत ......
जेवण  " असे "  करावे.......
आणि बऱ्याच  "अशा "  सूचना लिहिलेल्या पाट्या, मी वाचत वाचत वाचत  गेलो !


........... आणि सांगायची मुख्य गोष्ट  म्हणजे,
 देवळातल्या देवाला नमस्कार करायचेच  विसरून, मी तसाच घरी आलो !


मग घरच्याच  देवाला हात जोडून  प्रार्थना केली -

"  हे  देवा, वेळात वेळ काढून, क्षणभर हात जोडून तुझे दर्शन घ्यायला, सर्वजण  तुझ्या दारात येतात  .
त्यातले जास्त भक्त दरिद्री , भुकेले, गरीब लोकच  असतात. 
ज्यांना एक  वेळच्या जेवणाची भ्रांत असते- असेही गरजू आपले गाऱ्हाणे सांगण्यासाठी, तुझ्या पायाशी धाव घेतात.
 " असे  तसे करावे "  -  अशा  पाट्या नुसत्या वाचून, एकाचे तरी पोट  भरत असेल का ... ?
 पंचपक्वान्नाने भरलेले ताट गरीबाना न  दाखवता  -
 हे  "  पाट्याचे   स्तोम "   आवरण्याची सद्बुद्धी  त्या संबंधितांना दे ! "
.  
.

२ टिप्पण्या: