बाप्पा मोरया रे


स्वत: गणपतीने आपल्या आईवडिलाभोवती प्रदक्षिणा घालून ती विश्वप्रदक्षिणा जाहीर केली, 
हे सर्व जर "सुशिक्षित" (?) भाविक खरे मानतात,
तर.....
आपल्या घरातला गणपती जागृत असणारच-
आणि तोच आपल्या विश्वासाला नवसाला पावणार,
अशी दृढ श्रद्धा बाळगण्यात का कमीपणा वाटून घेत असतील बरे ?

त्यासाठी...
 पैसे खर्च करून रांगेत उभे करून,
तासनतास वेळ घालवून,
तथाकथित जागृत/नवसाला पावणाऱ्या राजा/महाराजा गणपतीसमोरच्या 
निर्बुद्ध/बिनडोक अशा कार्यकर्त्याकडून ... 
ऐन दर्शनाच्यावेळी ढकलले जाऊन/असभ्य/ अमानुष/ गैरवर्तणूक सहन करून...
शिकले सवरलेले/शहाणपणाने वागणारे/समंजस सुशिक्षित 
आपली बुद्धी का आणि कुठे बरे गहाण ठेवतात ?

"झी २४ तास"वरचे गणेश दर्शन घेणाऱ्या भक्तांचे चित्रित  दृष्य पाहून असे वाटले की, 
"जागृत" भाविक जनतेने "त्या" ढकलाढकली करणाऱ्या कार्यकर्त्यालाच बाप्पासमोर लाथाबुक्क्यांनी चांगले तुडवायला हवे होते ! 

महिला , पुरुष , मुले..
कुणाचाही मुलाहिजा न ठेवता तो कार्यकर्ता महिलांच्या अंगाला धरून ढकलत होता ! 

सगळे भाविक भक्त  इतके सहनशील आणि आंधळे !
एकालाही त्यालाच धरून ठोकावे वाटले नाही ? 

स्वत:च्या अंगाला धरून ढकलणाऱ्या त्या पोलीस महिलेनेही....
हे का सहन केले सगळे ?

सर्वात वाईट वाटले...
ही सर्व गैरवर्तणूक दाखवणाऱ्या आणि टीआरपी वाढवून घेणाऱ्या
मिडीयावाले असली अमानुष वागणूक बघून का विरुद्ध उभे राहिले नाहीत ?

जनजागृतीही  करत असतात ना  हे मिडीयावाले ?
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा