दु:खी भागीदारी

लग्न झाल्यावर तीन वर्षानंतर,
त्याच्या बायकोला अचानक साक्षात्कार झाला.

ती त्याला जेवताजेवता, जरासे फुरंगटूनच म्हणाली-
"आपल्या लग्नानंतरचे काही महिने आठवतात का तुम्हाला ?
रोज जेवतांना न चुकता,
तुम्ही तुमच्या प्रत्येक घासातला अर्धा घास-

 मला बळेबळेच भरवत होता.
पण हंssssss
अलिकडे मात्र पहिल्यासारख तुम्ही कधीतरी....

 प्रेमानेही मला ...."

तिला अर्ध्यावरच थांबवत तो म्हणाला -
" अग, तेव्हाची गोष्ट वेगळी होती....
आता तुला सगळा स्वैपाक किती मस्त जमतोय ना ! "
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा