एकजण दुसऱ्याला सांगत होता
कंटाळलो आता इतके घोटाळे करून
दुसरा म्हणाला
कंटाळून कसे चालेल ? आपल्याला देश चालवायचा आहे ना ?
पहिला उत्तरला
आपली वारस मंडळी आहेत ना तयार , मग कसली काळजी ?
दुसरा म्हणाला
एका घोटाळ्यातून दुसरा करायचा
त्यात नको त्याला अडकवायचं
परत त्याची सुटका करण्यासाठी,
आपणच धडपड करायची
स्वागतासाठी कमानी, ओवाळण्यासाठी पंचारत्या, मोठाले फलक ...
हे सगळ सांगायलातरी " आपल्यासारखे आणखी कुणी " नकोत का ?
पहिला म्हणाला
खर आहे दोस्ता ...
असे म्हणून-
तो पहिला
दुसऱ्याला पुढच्या घोटाळ्यात कधी कसे कुठे अडकवायचे
ह्याचा मनातल्या मनात विचार करून
आळस झटकू लागला !!!
.
मजा आणलीत राव ! असेच खोचक-रोचक लिहीत रहा !
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल आभारी आहे.
हटवा