तीन चारोळ्या

येता जाता नकोस धमकावू यमराजा 
नको विचारू, आता येऊ का मी नंतर -
जीवन जगणे झाले इथले मस्त कलंदर 
सरले जीवन-मृत्यूमधले कधीच अंतर ..
.


बोट धरुन चालण्यास शिकला 
तो रस्त्यावरुनी ज्या बापाचे-
हात धरुन घालण्यास निघाला
तो नाव वृद्धाश्रमी त्या बापाचे ..
.


बघ तो तूही चंद्र सखे, 
ढगाआड का हळूच पळतो -
येता माझ्याजवळ तू सखे
मनात का तो खरेच जळतो ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा