परमेश्वरा,
आमच्या देशाच्या मंत्रीमंडळातल्या
एकाही मंत्र्यांपैकी,
कुणाचेही नातेवाईक, सगेसोयरे, आप्तेष्ट, मित्रमंडळी सैन्यात नाहीत कारे ?
जर असतेच तर............
परवा ज्या दोन जवानांची निर्घृण हत्या,
सीमेवरच्या नापाक पाक सैनिकांनी केली,
त्यांच्याबद्दल दोन शब्द तरी,
तोंडातून उस्फूर्तपणे बाहेर काढले असते ना ?
दोन अश्रू तरी,
त्यांच्या डोळ्यांतून बाहेर टपकले असते ना ?
पण नाही .....!
सीमेवरच्या जवानांशी,
ह्या निर्लज्ज, बेशरम मंत्रीमंडळाला काहीच देणे घेणे नाही !
एकाही महाभागाने दु:ख व्यक्त केल्याचे,
किंवा त्या महाभागाला वाईट वाटल्याचे,
कुठेही जाणवले नाही !
नुसता निषेध खलिता ....
निषेध खलिता आणि..
निषेध खलिता !
खरे तर आमच्या मनात नाही ,
तरी पण सद्यस्थितीच अशी वाटत आहे की ,
ह्या मंत्र्यांपैकी कुणाचा तरी जवळचा असा-
त्या पाकड्यांच्या तावडीत सापडावा !
आणि....
त्याचे त्यांनी अमानुष हाल हाल करावेत !!!
कारण त्याशिवाय,
कोणत्याही मंत्र्याला,
खडबडून जाग येईल असे वाटत नाही ...
आणि लगेच बघा.........
कशी झाडून सगळी सरकारी यंत्रणा धडपडून,
कामाला जुंपली जाईल !
शेवटी काय,
ज्याचे जळते त्यालाच कळते !
. . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा