माझाही आत्मक्लेशपूर्ण उपास !



काल रविवार ,
सुट्टीचा दिवस ,
होळी पौर्णिमेपासून पुरणपोळी श्रीखंडपुरी असले रोज यथेच्छ गोड गोड खाऊन -
कंटाळा आला बुवा !

आता काही तरी बदल हवा म्हणून ,
काल मी एक संपूर्ण दिवस उपास करायचा ठरवले !

सकाळी सहा ते संध्याकाळी सहा ....

झाले ..शनिवारी शनिवारचा उपास होताच !

रविवारी सकाळी सहालाच -
भुकेने पोटात सगळेच पशुपक्षी ओरडून ,
चांगलाच धुमाकूळ घालू लागले !

उपास म्हणजे फलाहार चालतो ...इति सौभाग्यवती !
म्हटले, 
बायकोचे नाही, तर कुणाचे ऐकायचे अशा बिकट प्रसंगी ?

एक कलिंगड, दोन सफरचंद, तीन केळी, चार अंजीर, पाच चिक्कू ...
बस्स, एवढेच फराळासाठी म्हणून खाल्ले. ... 
म्हटलं उपास मोडायला नको .. 
आणि एकदा ठरवले ते मनापासून पार पाडायला तर हवेच ना !

सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी,
 बायकोच्या माहेरची मंडळी आली ...
त्यानी खास माझ्यासाठी 
डाळिंब, फणसाचे गरे, संत्री, दोन डझन हापूस आंबे आणलेले !

त्यांच्या प्रेमाचा अव्हेर कसा करायचा ?
.......म्हणून दिवसभर मी एक एक करून खात बसलो !

संध्याकाळी सहा वाजता -
 फक्त एक तांब्याभरून मिल्कशेक प्यालो !

काही म्हणा, 
आपली नाजूक तब्येत नीट सांभाळायची असेल तर ...

प्रत्येकाने रोज असा उपास करायला हवाच -
या निष्कर्षाला मी तरी आलो आहे ! 

. . .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा