चार चारोळ्या -----

जगातला सारा अंधार
माझ्याच प्रकाशाने दूर केला -
दिव्याच्या ज्योतीचा गर्व
वाऱ्याच्या  झुळकेने दूर केला !
.

जवळुन माझ्या गेली सकाळी
उधळुन पदराने गंधित वारा -
दिवसभर भावनांचे वादळ
घालते थैमान मनी सैरावैरा !
.

जगण्यातुनी मज एकच पटते 
"चेहरा" न खरी ओळख आहे -
ज्याचे त्याचे नाते शोधते 
"खिसा" रिता वा भरला आहे ..
.

 जिवंत होतो तेव्हां कुणी
भेटण्यास ना धडपडले -
मी मेल्यावर ते सारे का
मजभवती का येऊन रडले . .
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा