अनुत्तरीत स्वातंत्र्य-प्रेम


या देशात -
कित्येक गावी आज
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही
डोळ्यात पाणी आणूनच -
पाण्याच्या ट्यांकरसाठी
वाट पाहत राहावे लागते.........

कित्येक शहरी आज
त्यांच्या तोंडातून घशात
डोळे भरून, बिसलरी पाहून-
ती पिल्याशिवाय
दुसरे पाणी पचतच नाही .............

त्याच या देशाचा -
" मी नागरीक आहे "
हा अभिमान अजूनही -
कशासाठी बाळगावा .............. !!!
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा