तू तिथ मी

दोन वर्षे झाली होती लग्नाला .
सुट्टीचा दिवस होता. 

दुपारचे दोन वाजून गेले होते.
जेवणाचा पत्ता अजूनही नव्हता.

रीतीरिवाज, प्रथेनुसार नेहमीचे-

 आमचे नवराबायकोत भांडण सुरू झाले.

मी त्राग्याने विचारले,
" तुला सुट्टीच्या दिवशीच कसा उशीर होतो ग स्वैपाकाला ?
आता जेवायला मी घरात नाही थांबत.
बाहेर हॉटेलातच जेवून येतो. "

बायको चट्कन म्हणाली,
" दहाच मिनिटे थांबता का ? "

मी उत्सुकतेने पण चिडूनच विचारले,
" दहाच मिनिटे ? आणखी दहा मिनिटात तू स्वैपाकाचा असा काय उजेड पाडणार आहेस ग ? "

दुप्पट आवाजात, 

पण बायको ठामपणे ओरडली-
" माझ्या स्वैपाकाचा मी उजेड पाडीन,

 नाही तर अंधार !
पण तुम्हाला मी कशी बरी जाऊ देईन,
बाहेर हॉटेलात
एकट्यालाच जेवायला ?  थांबा -
दहा मिनिटात मीही तयार होते...

आणि तुमच्या बरोबर हॉटेलात जेवायला येते ! "
 

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा