अवघाची संसार


काय तर म्हणे... 
"आम्ही दोघांनी मिळून २५ वर्षे सुखाने संसार केला !"

कसं शक्य आहे हो हे ?

तुम्ही दोघ आपसात कधी विनाकारण भांडलात .....
मुळीच नाही .

दोघापैकी एकजण कधी रुसलय दुसऱ्यावर आजवर .......
कधीच नाही .

कधी बिन मिठाची भाजी, कच्चा भात, खारट आमटी ताटात पडली तुमच्या....
अजिबात नाही .

कधी चित्रपटाला किंवा नाटकाला जाण्यावरून भांडलात, रुसलात....
मुळीच नाही .

टीव्हीच्या रिमोटवरून भांडलात ....
कधीच नाही .

तुझी सासू अशी माझी सासू तशी......
 या विषयावर तरी वाद घातलाय का कधी..... 
अजिबात नाही .

मग "सुखाचा" म्हणजे-
नक्की कसा आणि- कशासाठी संसार केला हो ? 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा