आला रे..पळा -

मान करुनिया
ताठ आपली
कविता माझ्या  
वाचत सुटलो.. 

इतरां मुळी न 
कळते कविता 
समजही त्यांना
देऊ लागलो.. 

अभिमानाने
इकडे तिकडे 
बाड कागदी 
मिरवू लागलो..

कुणी न म्हटले 
तरी "मी कवी"
ओळख अपुली 
देऊ लागलो.. 

मित्रमंडळी 
दूर का पळती -
नवल मनी मी 
करू लागलो ! 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा