साठी बुद्धी नाठी -

त्या दिवशी सकाळी सकाळी-
नुकताच पावसाचा चार थेंबांचा शिडकावा होऊन गेलेला.

आदल्या दिवशी संध्याकाळी मॉर्निग वॉकला जाणे जमले नव्हतेच.

म्हटले चला, आता छान हवा पडली आहे ..
आताच उरकून घ्यावा सकाळचा तरी मॉर्निंग वॉक !

पाऊस नव्हता त्यामुळे "प्यार हुआ इकरार हुआ .." गुणगुणत निघालो.

रोजच्या पेन्शनरच्या कट्ट्यावर बसलो .
मस्त मजेत हसत खिदळत गप्पाटप्पा हाणल्या इतरांशी.

तासाभराने निघालो.......

काही लोक माझ्याकडे वळून वळून पाहत होते.

मनात म्हटल- खुशाल पाहू देत..
आपली प्रसन्न मुद्रा त्यांना पुन्हापुन्हा पहायची असेल कदाचित !

दारात पोचताच,
बायकोने नेहमीच्या सवयीने डोळे विस्फारून माझ्याकडे पाहिले,
आणि ती उद्गारली-
" अहो हे काय.. हातात दोन दोन छत्र्या कुणाच्या आहेत ?
तुम्ही बाहेर निघालात, तेव्हा जवळ असू द्यावी,
म्हणून ही दाराजवळ ठेवलेली छत्री-
तुम्ही बरोबर न्यायची विसरून गेला होतात न !"

गप्पा संपण्याच्या नादात, आपलीच समजून-
मी कट्ट्यावरच्या दोन छत्र्या एका हातात एक,
अशा उचलून घेऊन आलो होतो !

साठी बुद्धी नाठी ..
असे उगाच नाही शेक्सपिअरने म्हटले !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा