पाच चारोळ्या -

'लागली कुणाची उचकी-'

जेव्हां जेव्हां तुला मी 
विसरायचे मनांत ठरवले -
तेव्हां तेव्हां उचकीने
बेत माझे मनांत जिरवले ..
.

'काडीमोड अन् घरोबा -'

जमले नाही कधी सुखाशी 
"काडीमोड" घेतला तयाने -
संधी साधून त्याचक्षणी 
"घरोबा" जमवला दु:खाने ..
.

'सवय  -'

जोडिले मी हात
शांतपणे देवापुढे - 
प्रार्थिले त्यालाच
"लक्ष दे चपलेकडे" ..
.

'वृक्षतोड -'
जागाच होता चंद्र रात्रभर
विचारले मी त्याला कारण -
वदला "निंबोणीचे झाड
दिसले नाही, फिरलो वणवण" . .
.

'जीवन मरण -'

जोवर मजला जमते आहे
घ्यावे फुलासारखे जगून -
ना तर अंती राहणे आहे 
निर्माल्यासारखे पडून ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा