हाल कैसा है जनाबका ----- !


सकाळचा चहा म्हणजे,

बायकोबरोबर काल शिळ्या वाटलेल्या


यथेच्छ गप्पाटप्पा - 


आज ताज्यातवान्या करायची संधी !




विषय एका जुन्या मित्राच्या नव्या लग्नाचा निघाला ...




बोलता बोलता मी म्हणालो -



" किती हालात दिवस काढले होते बिचाऱ्याने !


आठवले की अजून अंगावर काटा येतो.


बरे झाले आता दोनाचे चार झाले.

सुखाचे दिवस पहायला मिळतील त्याला आता ! "




बायको शांतपणे उद्गारली -


" लग्न आत्तातर झालेय ना ?


खरे हाल आता सुरू होतील बघा ! "




मी रिकाम्या कपबशा आत नेत असताना....



बायको फेसबुकावर लॉगिन करत होती !!!


.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा